सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेत वाढ   

मुंबई : भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. आजपासून (रविवार) मंदिरात बाहेरून नारळ, हार, आणि प्रसाद आणण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त भास्कर शेट्टी यांनी दिली. 
   
शेट्टी म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी आम्हाला नारळ आणि इतर नैवेद्यांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. सिद्धिविनायक मंदिर दहशतवाद्यांच्या  निशाण्यावर आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडेच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसोबत यासंदर्भात बैठक झाली. यावेळी  पोलिसांनी आम्हाला काही सूचना दिल्या. भाविकांची तपासणी केली जाऊ शकते; पण देवाला अर्पण केलेल्या फुलांची आणि नारळाची तपासणी केली जाऊ शकत नाही. भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस आणि मंदिर ट्रस्टची आहे.

Related Articles